सुनील शेट्टीने ‘या’ चुकीच्या सवयीमुळे स्वतःच संपविले स्वतःचे करीयर..अक्षय आणि अजय सारखे ग्लॅमरस त्याच्या वाटेला कधीच आले नाही…

अभिनेता सुनिल शेट्टी याचे नाव घेतले की आपल्यासमोर एक असा धस्ट पुष्ट अभिनेता उभा राहतो. ना आवाज ना रंग तरीदेखील आपल्या जोरावर सुनील शेट्टी ने काही हिट चित्रपट बॉलिवूड मध्ये दिलेले आहेत. 1992 मध्ये बलवान या चित्रपटातून सुनील शेट्टी याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.
या चित्रपटात त्याला प्रचंड यश मिळाले होते. त्यानंतर त्याने तेवढ्यावरच न थांबता आणखी काही चित्रपट केले होते. सुनील शेट्टी हा बॉलिवूडमधील आज सर्वात मोठा उद्योगपती मानला जातो. सुनील शेट्टी याचे अनेक हॉ’टेल्स आहेत. सुनील शेट्टी सारखा व्यवसाय कोणी देखील करत नसल्याचे सांगण्यात येते.
आज यशस्वी उद्योगपती असला तरी करियरमध्ये त्याने अनेक चु’का केल्या. त्यामुळे त्याचे करिअर हे खूप यशस्वी होऊ शकले नाही. आज त्याच्या तुलनेत अनेक अभिनेते हे यशस्वी झाले आहेत. त्याच्यासोबत पदार्पण केलेले सलमान खान, आमिर खान, अजय देवगन, अक्षय कुमार हे अभिनेते खूप यशस्वी आहेत.
या कलाकारांनी आपल्या करिअरमध्ये अशा काही चुका केल्या नाही जेणेकरून त्यांचे करियर ब’रबा’द होईल. मात्र, सुनील शेट्टीने या तुलनेमध्ये काही चुका या केल्याचे पाहायला मिळते. सुनील शेट्टी याने बलवाननंतर क्रो’ध, सपूत, हेराफेरी, भाई दिलवाले या सारख्या चित्रपटात काम केले होते.
त्यानंतर त्याने धडकन या चित्रपटात काम केले. धडकन चित्रपटातील शिल्पा शेट्टी आणि अक्षय कुमार दिसले होते. हा चित्रपट प्रचंड चालला होता. या चित्रपटातील त्याच्या भूमिकेचे कौतुक देखील खूप झाले. मात्र, या चित्रपटानंतर सुनील शेट्टी याला पाहिजे तसे चित्रपट मिळाले नाही.
तसेच त्याची मागणी देखील कमी झाली आणि त्याला स्वतःला मा’र्केटिंग देखील करता आली नाही. त्यामुळे त्याला चित्रपट हे मिळाले नाहीत. या तुलनेत त्याच्या सोबतचे कलाकार जे होते त्यांना यश मिळत होते. आणि सुनील शेट्टी हा अपयशी होत होता. मात्र याची त्याने अजिबात खंत कधीच बाळगली नाही.
सुनील शेट्टी याने काही दिवसापूर्वी एक मुलाखत दिली आणि त्या मुलाखतीत त्याने अतिशय दिलखुलास असे उत्तर दिले. सुनील शेट्टी म्हणाला की, मी ज्यावेळेस करिअरच्या सुरुवातीला यशस्वी होतो, त्यावेळेस माझ्याकडे अनेक चित्रपट यायचे. त्यामुळे मी खूप हरखून जात होतो. आणि मला एवढे चित्रपट मिळत आहेत त्यामुळे मी आनंद देखील राहत होतो.
तसेच मी चित्रपटाच्या कथा न पाहताच चित्रपट साईन केले. त्यामुळे अनेक चित्रपटाचा मला फ’टका ब’सला. तसेच मी स्वतःचे मार्के’टिंग करण्यात देखील कमी प’डलो. त्यामुळे देखील मला करिअरमध्ये यश अधिक मिळाले नाही. यातूनच माझ्यासोबतचे कलाकार हे खूप उंचीवर गेले आहेत, असे देखील तो म्हणाला. तसेच मी एका बॅनर सोबतच काम केले.
ज्या वेळेस तुम्ही एका बॅनर सोबत काम करतात, त्यावेळेस तुमच्यावर शि’क्का ब’सतो. तुम्ही से’फ सा’इड सोडत नसतात. त्यामुळे तुम्हाला यश हे अधिक मिळत नाही, अशी खं’त देखील त्याने बोलून दाखवली. तसेच या मुलाखतीत त्याने अनेक दिलखुलास प्रश्नांची उत्तरे देखील दिली. तो म्हणाला की, आजच्या घडीला जर माझ्यावर कोणाला पै’से लावायचे असतील तर कोणी 50 को’टी रु’पये देखील लावणार नाही.
मात्र, यातूनही अक्षय कुमार याच्यावर पै’से लावायचे असतील तर त्याच्यावर 500 को’टी रु’पये हे लावले जातील. सुनील शेट्टी याने अक्षय कुमार सोबत सपूत हा चित्रपट केला होता, तर इतर चित्रपट देखील त्याने केले होते. तसेच अजय देवगन सोबत त्याने दिलवाले हा चित्रपट केला होता. आता सुनील शेट्टी हा आपला व्यवसाय चांगल्या रीतीने सांभाळत असल्याचे सांगण्यात येते.