ही भारतातील 5 बेस्ट कमांडो फोर्सेस आहेत, त्यांच्या समोर शत्रूही नाक घासतील…

प्रत्येक देश सशक्त बनविण्यासाठी विशेष साथ सैन्याची असते, ज्यामुळे प्रत्येक देश जगासमोर एक नवीन शक्ती म्हणून उदयास येत आहे. विशेष सैन्य आणि संरक्षण बळ आपल्या देशाचे सन्मान आणि जगात एक पूर्णपणे वेगळी ओळख निर्माण करत असते. भारतातही देशाची सुरक्षा याच बहाद्दरांच्या हाती आहे. जगात दहशतवादी कारवाया वाढत आहेत. सर्व देश त्यांच्या स्वत: च्या आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी कडक बंदोबस्त करत आहेत. देश आणि देशवासीयांच्या रक्षणासाठी आपल्या सेनेतून बलाढ्य सैनिक निवडून स्पेशल फोर्स तयार करतात.जे जगातील सर्व दुष्मनाशी लढायला तयार असतात.
मार्कोस मरीन कमांडो सर्वात ट्रेंडी आणि आधुनिक मानले जातात. मार्कोस जगातील सर्वोत्तम यूएस नेव्ही सील्सच्या धर्तीवर तयार केलेले आहे. मार्कोस कमांडो तयार करणे सोपे नाही. त्यासाठी कठोर परीक्षा घ्यावी लागते आणि त्यानंतर कमांडो निवडले जातात. त्यांना अमेरिकन आणि ब्रिटीश सिल्स सोबत अडीच वर्षे कठोर प्रशिक्षण घ्यावे लागले. देशातील हे कमांडो जमीन, समुद्र आणि हवेमध्ये लढायला पूर्णपणे सक्षम असतात. मार्कोस कमांडो हा भारतीय नौदलाचा एक भाग आहे.
पैरा कमांडोपैकी जे भारतीय सैन्याचे सर्वात प्रशिक्षित विशेष दल मानले जाते. सैन्यातील त्या सैनिकांनाच या विशेष सैन्यात भाग घेण्याची संधी मिळते, जे शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी आणि बळकट आणि अत्यंत बुद्धिमान आणि प्रेरणादायक असतात. ह्या कमांडो ची सुरुवात शरीरावर 65 किलो वजन आणि कितीतरी किलोमीटर पळन्याने होते. पॅरा कमांडोजची जबाबदारी विशेष ऑपरेशन्स, बंधक समस्या, दहशतवादविरोधी ऑपरेशन्स आणि शत्रूचा नाश करण्यासारख्या कठीण कामांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
गरुड कमांडो फोर्स :
गरुड कमांडो एअर फोर्सचा एक भाग, ही देशातील सर्वात अत्याधुनिक आणि प्रशिक्षित कमांडो फोर्स आहे. अगदी अलीकडे त्यात फक्त 2000 कमांडो आहेत. अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी सशस्त्र, हे सैन्य विशेषतः एअरफील्ड हल्ला करणे, हवाई हल्ला, बचाव कार्यासाठी तयार केलं जाते आहे.
घातक फोर्स :
घातक फोर्स चे जवान हे त्याच्या नावाप्रमाणेच घातक म्हणून ओळखले जाते. हा देखील भारतीय सैन्याचा एक भाग आहे. शत्रूशी समोरासमोर झालेल्या लढायांमध्ये त्यांचा सर्वाधिक वापर केला जातो. हे जाणून आश्चर्यचकित होशाल की घातक फोर्स मधील सैनिक इतके सामर्थ्यशाली आणि ताकदवान आहेत की एक एक जवान 20 लोकांना भारी पडू शकतो.
कोब्रा कमांडो ही भारतातील सर्वोत्तम शक्तींपैकी एक आहे. कोब्रा फोर्स हे केंद्रीय राखीव पोलिस दलाचे एक विशेष दल आहे. वेश बदलून शत्रूवर हल्ला करण्यासाठी त्यांना विशेष प्रशिक्षण दिले जाते. यासाठी त्यांना विशेष ‘गोरिल्ला प्रशिक्षण’ दिले जाते. त्यांना नक्षलवाद्यांशी लढायला पाठवले जाते.