अरबों रुपये आहेत अमिताभ बच्चन कडे, पण आजही हलाखीचे जीवन जगतोय अमिताभ चा हा परिवार

अमिताभ बच्चन यांनी केवळ देशातच नव्हे तर परदेशातही बरेच नाव कमावले आहे. बॉलिवूडचा सुपरस्टार मानले जाणारे अमिताभ बच्चन यांनी जितकी प्रसिद्धी मिळविली तितके पैसे ही मिळवले. अमिताभ बच्चन यांच्या कठोर परिश्रमाचे फळ म्हणजे बच्चन कुटुंब हा देशाच्या अब्जाधीशांमध्ये गणला जातो. वयाच्या 60 व्या वर्षीही अमिताभ बच्चन सतत काम करत आहेत. कोट्यावधी रुपयांचे मालक असलेल्या अमिताभ यांच्या कुटुंबामध्ये प्रत्येक सोई सुविधा आहे, पण आज आम्ही त्यांच्या कुटुंबातील अशाच एका सदस्याबद्दल सांगणार आहोत ज्यांचेकडे पैसेच नाहीयेत.
त्या कुटुंबाबद्दल बोलण्याआधी आम्ही हे सांगतो की बॉलीवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन यांची एकूण संपत्ती 400 मिलियन डॉलर असल्याचे सांगितले गेले आहे. त्यांचे कारकीर्दीत 180 हून अधिक चित्रपट करणारे अमिताभ यांनी 1969 मध्ये फिल्मी करिअरची सुरुवात ,”सात हिंदुस्तानी” ने केली होती. परंतु, आम्ही आज ज्यांचे बद्धल सांगणार आहोत ते बच्चन कुटुंबापासून विभक्त झालेल्या कुटुंबाबद्दल जे दररोजच्या भाकरीसाठी आसुसलेले आहेत. कदाचित तुमच्या मनात असा विचार आला असेल की जर अमिताभच्या कुटुंबात सर्व लक्षाधीश असतील तर मग हे कोण आहे? तसे तर अमिताभ चे कुटुंबातील सदस्याची चर्चा केली तर ऐश्वर्या, अभिषेक, जया बच्चन यांचेकडे तर अमाप पैसा आहेत.
अनूप रामचंद्र यांचे कुटुंब :
अमिताभ बच्चन यांच्या काकूंचा मुलगा अनुप रामचंद्र यांच्याबद्दल आपण आज बोलत आहोत. अनूप रामचंद्र यांच्याशी बच्चन कुटुंबाचे खास नाते आहे. असे असूनही रामचंद्र यांना आज गरीबीत जीवन जगण्यास भाग पडत आहेत. अनूप रामचंद्रचे कुटुंब प्रथम थोडे पैसे वाले होते, परंतु वेळेमुळे त्यांना पैसाच अप्रुक झाला. अमिताभ आणि अनूप यांच्यातील विवादाचे मुख्य कारण म्हणजे जमीन विवाद.
ज्यामुळे अमिताभ यांना अनूप आणि त्याच्या कुटुंबापासून दूर राहणे पसंत केले आहे. अनूपने अभिषेक बच्चनच्या लग्नात भाग न घेण्याचे कारण सांगितले होते की पैशाच्या अडचणीमुळे तो येऊ शकत नव्हता. अनूप आणि त्यांची पत्नी मृदुला कटघरमधील अमिताभ बच्चन यांच्या घरात राहतात. अनूपच्या मते हे घर वडिलोपार्जित आहे, त्याबद्दल अमिताभ आणि अनूपमध्ये काही वाद आहेत. तथापि, अमिताभ यांचे अनूपच्या कुटुंबियांपासून दूर राहण्याचे कारण अजूनही स्पष्ट झाले नाही.