हेमा मालिनी यांनी लग्नासाठी नकार दिल्यामुळे आयुष्यभर अविवाहित राहिला ‘हा’ दिगग्ज अभिनेता, पुढे कमी वयातच ह्र’दयवि’काराने झाले नि’धन…

आपल्या बॉलिवूड मध्ये, आपण खूप प्रेमकथा पहिल्या आहेत. बॉलिवूड मध्ये प्रेमकथा जितक्या असतात त्यापेक्षा जास्त ब्रेकअप म्हणजेच प्रेमभंगाच्या कथा जास्त आहेत. अमुक एका अभिनेत्रीचे, तमुक एका अभिनेत्यासोबत जवळीक वाढली आणि त्यातून त्यांना एकमेकांबद्दलची ओढ निर्माण झाली.
हि ओढ इतकी वाढते कि त्याचे प्रेमात रूपांतर होते. असे आपण खूप वेळा पहिले आहे. मात्र सुरुवातीच्या काळात सोबत असणारे हे कपल्स हळूहळू दूर होऊ लागतात, आणि त्यांच्यामध्ये दुरावा निर्माण होतो. हा दुरावा टोकाला जाऊन ते एकेकांपासून दूर होतात आणि ब्रेकअप होते…
हे असे ब्रेकअप चे बरेच किस्से आपण ऐकलेले आहेत, मात्र काही किस्से असे असतात जे सुरु होण्याआधीच संपतात. पण, ह्या संपलेल्या प्रे’मक’थेतून एक नवीन कथा बनते.. असेच काही घडले होते बॉलीवूडमध्ये… हेमा मालिनी, संजीव कुमार आणि सुलक्षणा पंडित ह्यांची कथा देखील अशीच रोमांचकारी आणि प्रे’मात वे’डे करणारी आहे.
बॉलिवूडची ड्रीम गर्ल म्हणून अभिनेत्री हेमा मालिनी ह्या चांगल्याच प्रसिद्ध होत्या. ह्या ड्रीम गर्ल वर एकेकाळी बलिवूडमधील अनेक मोठाले आणि दिग्ग्ज हिरो फिदा होते. बरेच स्टार्स होते ज्यांना हेमा ह्यांच्या सौंदर्याने वे’डे केला होते आणि त्यांना त्यांच्यासोबत सेटल व्हायची इच्छा होती.
मात्र बाजी मारली ती पंजाबचा पुत्र धर्मेंद्र ह्यांनी. धर्मेंद्र आणि हेमा ह्यांची प्रे’मक’हाणी खूपच प्रसिद्ध होती आणि अजूनही आहे. मात्र धर्मेंद्र यांच्या व्यतिरिक्त जितेंद्र आणि संजीव कुमार या दोन दिग्ग्ज अभिनेत्यांचे नाव हेमा यांच्यासोबत जोडलं गेलं होतं
जितेंद्र आणि हेमा यांनी ‘दुल्हन’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान खूप वेळ एकत्र घालवला होता. असे सांगण्यात येते की, हे शूटिंग संपल्यानंतर जीतेंद्र थेट आपल्या पालकांसह हेमाच्या घरी पोहोचले. त्याच दरम्यान जितेंद्र आणि हेमा मालिनी यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला असल्याच्या बातमीला चांगलीच उधाण आले होते.
पुढे असे देखील बोलले गेले होते की, ते दोघं लग्न करण्यासाठी चेन्नईमध्ये गेले. त्यावेळी जितेंद्र यांचं शोभा कपूरसोबत आधीच लग्न झालं होतं. धर्मेंद्र यांनी जितेंद्र यांची पत्नी शोभा कपूर यांच्याकडे धाव घेतली. आणि मग हे लग्न थांबवण्यासाठी दोघे सोबत चेन्नईला रवाना झाले. त्यानंतर, हेमाशी लग्न करण्याचं जितेंद्र यांचं स्वप्न स्वप्नचं राहिलं.
मात्र, संजीव कुमार ह्यांचे हेमा मालिनी साठी असलेले प्रेम खूपच वेगळे होते. त्यांना हेमा मालिनी सोबत लग्न करण्याची इच्छा होती, आणि त्याबद्दल त्यांनी हेमाला मागणी देखील घातली होती. परंतु, धर्मेंद्र च्या प्रेमात वेड्या झालेल्या हेमा मालिनी ह्यांनी संजीव यांना नकार दिला. मात्र, हेमा ह्यांच्या प्रेमात वेडे झालेल्या संजीव ह्यांनी त्यांच्या नाकारांनंतर इतर कोणाशीच विवाह नाही केला.
हेमा साठी त्यांचे प्रेम बघून प्रसिद्ध अभिनेत्री सुलक्षणा पंडित ह्या संजीवच्या प्रेमात पडल्या. त्यांनी संजीव ह्यांना विवाहासाठी मागणी घातली, मात्र त्यांनी सुलक्षणा पंडित ह्यांना नकार दिला. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की, सुलक्षणा पंडित ह्यांनी देखील कोणाशीच विवाह नाही केला…
सीता और गीता, धूप छांव अश्या काही सिनेमांमध्ये संजीव कुमार आणि हेमा ह्यांनी सोबत काम केले आहे. संजीव कुमार ह्यांना हेमा माहिती ह्यांनी नकार दिला म्हणून त्यांनी विवाह नाही केला, आणि संजीव ने नकार दिला म्हणून सुलक्षणा ह्यांनीदेखील विवाह नाही केला. संजीव कुमार ह्यांचं ४७ व्य वर्षी हृ’दयवि’काराने नि’ध’न झाले..