किशोर कुमार यांच्या पत्नीने घ’टस्फो’ट घेऊन केले होते मिथुन चक्रवर्ती सोबत लग्न, नंतर किशोर कुमार यांनी असा घेतला होता सूड…

आपल्याला माहित असेल कि लोक अजूनही किशोर कुमार याची गाणी ऐकतात. तसेच ते त्यांच्या आवाजा व्यतिरिक्त, ते त्यांच्या तेजस्वी व्यक्तिमत्त्वासाठी देखील परिचित होते. यामुळे त्यांनी बर्याच चित्रपटांमध्ये अनेक भूमिका देखील केल्या आहेत. तसा किशोर कुमार याचा स्वभाव अगदी आनंदी होता. परंतु खासगी आयुष्यात ते एकटेच राहिले.
जरी त्यांनी त्याच्या उभ्या आयुष्यात चार लग्न केली असली तरी, ते अंतर्गतदृष्ट्या खूप एकटे होते. आपल्याला माहित असेल कि किशोर कुमार यांनी अमिताभ बच्चन, राजेश खन्ना, शम्मी कपूर, धर्मेंद्र अशा अनेक दिग्गज कलाकारासाठी आवाज दिला आहे. पण त्यांनी मिथुन चक्रवर्ती याच्यासाठी काही काळानंतर अजिबात आवाज दिला नाही म्हणजेच त्याच्यासाठी गायन केले नाही.
पण आपणास सांगू इच्छितो कि त्यामागे कारण देखील तसेच होते. चला तर मग जाणून घेऊ कि असे या दोघांमध्ये काय घडले होते. आपल्याला माहित असेल कि बॉलिवूडचा डिस्को डान्सर मिथुन चक्रवर्ती यांचा जन्म १६ जून १९५० ला कोलकातामध्ये झाला. चित्रपटसृष्टीत प्रवेश करण्याआधी मिथुन एक न’क्षलवा’दी होते असे म्हटले जाते.
पण भावाच्या मृ’त्यूनंतर घरची जबाबदारी त्यांच्यावर आल्याने त्यांना घरी परत यावे लागले. मिथुन यांनी बॉलिवूडचा एक काळ गाजवला होता असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. मिथुन यांचे अभिनेत्री योगिता बाली यांच्यासोबत लग्न झाले असून त्यांना तीन मुलं आणि एक मुलगी आहे.
योगिता बाली यांचे मिथुन यांच्यासोबत लग्न होण्याआधी अभिनेता किशोर कुमार यांच्यासोबत लग्न झालेले होते. किशोर कुमार यांचे पहिले लग्न रुहा गुमा यांच्यासोबत झाले होते. त्या दोघांना एक मुलगा देखील आहे. रूमा आणि किशोर कुमार यांच्यातील घ’टस्फो’टानंतर किशोर यांनी अभिनेत्री मधुबाला यांच्यासोबत लग्न केले.
पण काहीच वर्षांत मधुबाला यांचे नि’धन झाले. त्यांच्या नि’धनानंतर किशोर कुमार यांच्या आयुष्यात योगिता बाली आल्या. या दोघांमधील मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि त्यानंतर दोघांनी लग्नही केलं. पण १९७६ मध्ये दोघांनी लग्न केलं त्यानंतर अवघ्या दोन वर्षांतच यांचा संसार मोडला.
आणि त्यांनंतर योगिता बाली यांनी मिथुन चक्रवर्ती यांच्याशी लग्न केलं. मिथुन आणि योगिता यांची भेट ख्वाब या चित्रपटाच्या सेटवर झाली होती. याच चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी लग्न करण्याचे ठरवले.
योगिता बाली आणि मिथुन चक्रवर्ती यांच्या लग्नानंतर किशोर कुमार यांनी मिथुन चक्रवर्ती यांच्यासाठी गाणे बंद केले. मिथुन आणि योगिता यांच्या लग्नाचा किशोर कुमार यांना चांगलाच धक्का बसला होता. आणि त्यांनी रागाच्या भरात मिथुन चक्रवर्ती याना चित्रपटांच्या सेट वर जाऊन चांगलेच झापले होते.
पण त्या दोघांच्या लग्नानंतर काही वर्षांनी सगळे काही विसरून सुरक्षा आणि वक्त की आवाज यांसारख्या चित्रपटांसाठी किशोर यांनी मिथुन चक्रवर्ती यांच्यासाठी गाणी गायली. विशेष म्हणजे वक्त की आवाज या चित्रपटातील गुरू गुरू हे त्यांनी गायलेले शेवटचे गाणे ठरले. या गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या दिवशीच त्यांचे नि’धन झाले.