आमिर-किरण रावच्या घटस्फोटावर कंगनाने केला खळबळजनक वक्तव्य, म्हणाली; मुस्लिम अभिनेतेच लग्न करून….

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत तिच्या वा’दग्र’स्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. कंगना सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर कंगना तिचं मत मांडताना दिसते. मागील काही दिवसांपासून कंगनाचे ट्विटर अकाउंट ब्लॉक केल्यामुळे कंगना आपल्या वक्तव्यपासून काही काळ दूर होती.
पण पुन्हा एकदा कंगनाने इंस्टाग्रामच्या माध्यमातून आता बॉलिवूड अभिनेता आमिर खान आणि किरण राव यांच्या घ’टस्फो’टावर व’क्तव्य केलं आहे. यावेळी तिने मु’स्लिम स’मुदाया संदर्भात एक प्रश्न विचारला आहे.
कंगनाची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. कंगनाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवरून एक पोस्ट शेअर केली आहे. “एक काळ असा होता जेव्हा पंजाबमधील कुटुंबांमध्ये एका मुलाला हिं’दू तर दुसऱ्या मुलाला शीख धर्माचे पालन करावे लागायचे. तशी परंपरा होती. परंतु अशी परंपरा हिंदू आणि मु’स्लिम, मु’स्लिम आणि शीख समाजामध्ये नाही.
आमिर खान सरांनी घ’टस्फो’ट घेतल्याचे मला आ’श्चर्य वाटले. त्यानंतर असा विचार मनात आला की, हिंदू आणि मु’स्लीम आं’तरध’र्मिय लग्नातून ज’न्माला आलेली मुलं नेहमीच मु’स्लिम का होतात. महिला हिंदू धर्माचे पालन का करू शकत नाही. काळानुसार आपल्याला या गोष्टीही बदलायला हव्यात.
ही एक जुनी प्रथा आहे. जर एखाद्या कुटुंबामध्ये हिंदू, जैन, बौद्ध, शीख आणि नास्तिक एकत्र राहू शकतात तर मग मु’स्लिम का नाही राहू शकत? एखाद्या मु’स्लिम व्यक्तीशी लग्न झाल्यानंतर आपल्याला धर्म का बदलावा लागतो?”,असे कंगना त्या पोस्टमध्ये म्हणाली आहे.
‘लगान’ चित्रपटाच्या सेटवर आमिर खान आणि किरण रावची पहिली भेट झाली होती. किरण राव या चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत होती. काही वेळ एकत्र घालवल्यानंतर आमिर आणि किरणने २८ डिसेंबर २००५ सालामध्ये लग्नगाठ बांधली होती. तर २०११ मध्ये सरोगसीच्या मदतीने मुलगा आझादचा जन्म झाला होता.
किरण रावशी आमिर खानचं हे दुसरं लग्न होतं. या आधी १९८६ सालामध्ये आमिर आणि रीना दत्ता विवाहबंधनात अडकले होते. १६ वर्षांनी आमिरने रीनाला घ’टस्फो’ट दिला होता. रीना आणि आमिरला आयरा आणि जुनेद ही दोन मुलं आहेत.
कंगनाचा ‘थलायवी’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात कंगना तामिळनाडूच्या दिवंगत माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट जयललिता यांच्या आयुष्यावर आहे. हा चित्रपट तीन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. यानंतर कंगना ‘तेजस’ आणि ‘धाकड’ या दोन चित्रपटांमध्ये दिसेल.